पृष्ठे

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

प्रश्न...

जन्माला येणं ते कशासाठी, काय म्हणून? ही शिक्षा कि वरदान? जगणं तेही कोण्या करणे ? केवळ मरण येत नाही म्हणून? अन हे अज्ञान तरी का म्हणून आणि जर उत्तरेच मिळणार नसतील तर हे डोक्यात येणारे प्रश्न तरी कशासाठी? देव कोण आहे आणि तो आमच्यापासून असा लपून-छपून का राहतो? आम्ही काय गुन्हा केलाय? मुळातच तो आहे कि नाही? आहे म्हणावं तर बुद्धी त्याच्या अस्तित्वावर हजारो प्रश्नांचं कुंपण चढवते आणि नाही म्हणावं तर मन हट्टाला पेटून त्याचं अस्तित्व मान्य करायला लावतं. सत्य मात्र मन आणि बुद्धीच्या वादात न पडता दूर कुठेतरी दृष्टीक्षेपाच्या पार पलीकडे उभं असतं.  आधी अस्तित्वासाठी लढणं, मग ते टिकवण्यासाठी आणि एकदा का ते शाश्वत झालं कि मग समृद्धीसाठी धावणं हे असं अविरत चालू असतं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा