पृष्ठे

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

मंगळयान

आजकाल कुणीही कशावरही भाष्य करू लागलाय. पत्रकारांना तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्याच गोष्टींवर आपापले विचार मांडायचा परवानाच मिळालेला असतो. आणि ते त्यांचा हा  हक्क अगदी इमाने इतबारे बजावत असतात. आपल्याला एखाद्या विषयातली माहिती असो अथवा नसो त्याबद्दल आपले मत असले पाहिजे आणि ते ठामपणे मांडले पाहिजे असे त्यांना वाटत असते. आता लोकसत्तामधला हा आजचा अग्रलेखच पहा. अतिशय उथळपणे, पुरेसा विचार न करता लिहिलेला अग्रलेख म्हणता येईल. यांच्या म्हणण्यानुसार 'आपण पाठवलेली संशोधन उपकरणे केवळ २५ किलो वजनाची आहेत आणि त्यामुळे आपण मंगळावर काही फार संशोधन करणार नाही आहोत आणि ही मोहीम म्हणजे आपण आपल्या हिमतीवर मंगळ मोहीम आखू शकतो हे जगाला दाखवणे हा आहे.  आणि मंगळयान हे मंगळापासून सुमारे ३६० किमी अंतरावर असेल म्हणजे मुंबईत बसून रत्नागिरीचा अभ्यास केल्यासारखं आहे'.  तर माननीय महोदय उपकरणांच्या वजनावरून त्यांच्या क्षमतेचा अंदाज करायला आपण कुठे शिकलात? आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो अंतराळ मोहिमेत  ३६० किमी  हे अंतर म्हणजे फार जास्त  नसतं, आपले उपग्रह हजारो किमी अंतरावर असतात आणि तिथूनसुद्धा ते हाय क्वालिटी फोटोज घेऊ शकतात. 

ब्रह्मपुत्रा होस्टेल IIT Madras...कॅमेऱ्यातून


गेली जवळपास दोन वर्षे मी जिथे राहतोय त्या आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलचे हे काही फोटोज. मोबाईलच्या कॅमेऱ्यातून घेतल्याने फोटो क्वालिटी तितकीशी चांगली नाही. तरीही a picture is worth more than thousand words...! म्हणून हा प्रपंच. तसं आमचं होस्टेल म्हणजे अगदी हिरवाईने नटलेलं आहे हे पहालच तुम्ही. 

एका सायंकाळी होस्टेलच्या गच्चीवरून घेतलेला हा फोटो

माझ्या रूममधून दिसणारा होस्टेलचा परिसर




वृक्षवल्ली आम्हां सोयरे…


आणि ही वनचरे सुद्धा… 


हे badminton court … 

… आणि ही माझी रूम. 


एक झाड वठलेलं… 


माझ्या रूमच्या galleryमधून दिसणारं दृश्य 

galleryतून आत येणारं सकाळचं उन… 

हा सुद्धा galleryमधून घेतलेला एक फोटो… 

रात्र उतरल्यावर 


होस्टेलवर हळुवार उतरणारं चांदणं… 



आणि हा इथे मी … 


बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

पैलतीर

मागच्या मे महिन्यात घरी गेलो होतो, दर वेळी जातो तसाच. एके दिवशी सकाळी लवकर उठलो (जे आता फार क्वचित घडतं) आणि मग जाणवलं की इथे सगळं काही तसंच पूर्वीसारखं आहे. आई, अण्णा, बहिणाबाई सगळेच सकाळी सहाच्या आधी उठतात. सात वाजेपर्यंत सगळ्यांचं अंघोळ करून झालेलं असतं. सगळ्या खोल्या झाडून स्वछ झालेल्या असतात. आई अजून रोज अंगणात सडा टाकते, रांगोळी काढते, तुळशीची पूजा करते. हे तुळशीवृंदावनसुद्धा अगदी तेच आहे. अण्णा सकाळी सकाळी काळ्या कमानीकडे जाऊन भाजीपाला आणतात. पेपरवाला भल्या सकाळी येउन पेपर टाकून जातो. दहीवल्या मावशी अजून रोज सकाळी न चुकता दही घ्यायचं का म्हणून विचारतात. सगळ्याच अंगणांत साडे शिंपण चाललेलं असतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची तशीच धावपळ चाललेली असते जशी माझी असायची. मीही असाच होतो काही वर्षांपूर्वी, शाळेत असताना. हे सगळं किती मस्त आहे. मला माझे शाळेचे दिवस आठवले. किती उत्साह होता जगण्यात तेव्हा. सकाळी सात वाजता शाळा भरायची आणि आम्ही साडेसहालाच घरातून निघायचो. (सकाळचे सहा वाजल्याचं घड्याळात पाहून आता युगं उलटली असं वाटतंय. ) मग दहावीचं वर्ष. दिवसभर शाळा, एक्स्ट्रा क्लासेस यात किती बिझी असायचो तरीही तरतरीत. हा वसमत रोड रोज सकाळी सकाळी किती प्रफुल्लीत वाटतो अजूनही. पण आता मला या सगळ्यापासून खूप दूर आल्यासारखं वाटतंय. स्वतःच्याच प्रश्नांमध्ये इतका गुरफटत गेलो कि या गोष्टींकडे लक्षच राहिलं नाही. आपल्या प्रश्नांच्या पलीकडेसुद्धा जग आहे आणि ते खूप सुंदर आहे हे भानच राहिलं नाही. पण हे लवकर लक्षात आलं हेही नसे थोडके.