चला रात्र झाली, निरव शांतता सगळीकडे पसरली आणि मनाचे आवाज ऐकू येत आहेत. असं इअरफोन कानात टाकून लिहायचा योग बऱ्याच दिवसांनी आलाय. वेळ नव्हता असं नाही, इच्छा नव्हती असंही नाही पण लिहायला जी एक उर्मी लागते ती नव्हती. असो.
आयुष्यात उद्या आहे म्हणून आज आनंद आहे. कारण उद्याच्या बळावर आज आशा जिवंत आहे आणि नुसती जिवंतच नाही तर तिला स्वप्नांचे धुमारेही फुटलेले आहेत. हे असं स्वप्नं पाहणं जिवंत असल्याचं लक्षण आहे, नाही का? एक विचार किंवा एक इच्छा, मग एक आशा, मग भव्य स्वप्नं, आणि मग त्यांची पूर्ती किंवा त्यांचा चक्काचूर आणि मग अजून एक नवा विचार हेच तर आयुष्य.
आयुष्यात उद्या आहे म्हणून आज आनंद आहे. कारण उद्याच्या बळावर आज आशा जिवंत आहे आणि नुसती जिवंतच नाही तर तिला स्वप्नांचे धुमारेही फुटलेले आहेत. हे असं स्वप्नं पाहणं जिवंत असल्याचं लक्षण आहे, नाही का? एक विचार किंवा एक इच्छा, मग एक आशा, मग भव्य स्वप्नं, आणि मग त्यांची पूर्ती किंवा त्यांचा चक्काचूर आणि मग अजून एक नवा विचार हेच तर आयुष्य.