I have believed this always. The whole point of this belief is why think in a constrained way? Why let your experience hinder your imagination? And also why let others' experience influence your opinion or belief or thoughts? Actually that's okay as long as the things are very objective and quantifiable. (I believe that beyond a limit everything is subjective. There is nothing objective at all in precise sense and the quantification is just an approximation). But where things start getting fuzzy, having first hand experience or at least keeping your skies open for your imagination to fly is better than accepting any idea alien to your mind. I have always believed that whatever knowledge we have acquired is almost correct 'so far' and may be not so in universal sense. You find one black swan and all your beliefs (or theories) are shattered. So it is advisable to just believe that swans are white 'so far'. Keep your mind open to new truths or new perspectives of the same truth. Even the electrons don't know objectively if they exist or not. Sometimes the term truth itself is the matter of experience rather than blind acceptance. It has many many ways to reveal itself and not just one. I also, most of the times, wonder if we have a capability to see the whole picture.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
मंगळवार, ३१ मार्च, २०१५
शुक्रवार, १३ मार्च, २०१५
Watching an awesome movie - "Liberal Arts". I like this, I mean watching the movies late night when everyone and everything around is asleep. Movies with good background music and a good story and near perfect words woven into dialogues expressing your own heart. While all you listen is just a periodic noise of the fan and your heart and of course the movie dialogues and music but all that is in sync with your heart. Yes, you listen to your heart when nothing else is there to disturb. No worries, no tensions, no problems, no questions. You keep all your worries and all your problems aside for this moment. And here you are listening to your true self. I like such movies and also such books which put your emotions, thoughts, opinions, feelings, etc. into precise words which you have always struggled to express. Sometimes you feel like that's exactly I have wanted to say always.
शुक्रवार, ६ मार्च, २०१५
India's Daughter
India's Daughter ही बीबीसीची डॉक्युमेंटरी पहिली. तिच्यामध्ये मला काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही आणि तिच्यावर बंदी घालायची काहीच गरज नव्हती. जे दाखवलं गेलं ती वस्तुस्थिती आहे. खरं तर या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची पाशवी मानसिकता जगासमोर आली. आणि गुन्हेगारच कशाला, खुद्द वकिलांचे बुरसटलेले विचार पाहून वाटलं आगोदर त्यांनाच फासावर लटकावलं पाहिजे. मुख्य म्हणजे गुन्हेगाराला आपण केलेल्या कृत्याचा यत्किंचितही पश्चात्ताप नाही हे पाहून तर नुसता संताप झाला. मान्य आहे की कायदेशीर कारवाई व्हायला वेळ लागतो, पण किती? आणि अशाच अनेक केसेस ज्या अजून लटकलेल्या आहेत त्या कधी निकाली काढणार? आपल्या न्यायव्यवस्थेवरही एक प्रश्नचिन्ह या निमित्ताने उभं झालं आहे
या डॉक्युमेंटरीवरून सोशल मिडियामध्ये दोन सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. एक जे बंदीची मागणी करतात किंवा सरकारचं समर्थन करतात आणि दुसरे जे बंदीला विरोध करतात. मला वाटतं डॉक्युमेंटरीवर बंदी घालून सरकारनं सगळ्या जगात स्वतःचं हसं करून घेतलेलं आहे आणि आपल्या देशाची नाचक्की करून घेतली आहे. डॉक्युमेंटरीमागे बीबीसीचा उद्देश काय असायचा तो असेल. बंदीची मागणी करणाऱ्यांचा युक्तिवाद असा की युरोप आणि इंग्लंडमधेही बलात्कार होतातच की त्याची का नाही डॉक्युमेंटरी बनवली जात? हा युक्तिवाद त्या डॉक्युमेंटरीमध्ये मुलाखत देणाऱ्या बलात्काऱ्याचीच भाषा नाही तर काय आहे? 'भारतात एवढे बलात्कार होत असतात मग बळी जाणारे आम्हीच का?' असं तोही विचारात होता आणि त्याचा वकीलही.
डॉक्युमेंटरीमुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होईल आणि त्याचा आपल्या पर्यटनावर आणि आणखी कशावर परिणाम होईल अशी सरकारला भीती वाटत असेल तरीही इथे सरकारचं चुकलेलं आहेच कारण असं बंदी घालून गोष्टी लपवत येत नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. असंही महिला सुरक्षेच्या बाबतीत भारताची प्रतिमा जगात फार उजळ आहे असं मुळीच नाही. नुसतंच incredible India म्हणून भागात नाही तर त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. नुसते कठोर कायदेच नाही तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरतेने आणि तत्परतेने व्हायला हवी. शासन, प्रशासन आणि पोलिस यांनी संवेदनशील आणि जागं असायला हवं. जनतेकडे नुसतं सब्जेक्ट्स म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहायला हवं. मुख्य म्हणजे न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलने करावी लागू नयेत कारण सगळ्यांनाच ते जमत नाही आणि तेवढी उर्जाही सगळ्यांमध्ये नसते.
या डॉक्युमेंटरीवरून सोशल मिडियामध्ये दोन सरळ सरळ दोन गट पडलेले दिसतात. एक जे बंदीची मागणी करतात किंवा सरकारचं समर्थन करतात आणि दुसरे जे बंदीला विरोध करतात. मला वाटतं डॉक्युमेंटरीवर बंदी घालून सरकारनं सगळ्या जगात स्वतःचं हसं करून घेतलेलं आहे आणि आपल्या देशाची नाचक्की करून घेतली आहे. डॉक्युमेंटरीमागे बीबीसीचा उद्देश काय असायचा तो असेल. बंदीची मागणी करणाऱ्यांचा युक्तिवाद असा की युरोप आणि इंग्लंडमधेही बलात्कार होतातच की त्याची का नाही डॉक्युमेंटरी बनवली जात? हा युक्तिवाद त्या डॉक्युमेंटरीमध्ये मुलाखत देणाऱ्या बलात्काऱ्याचीच भाषा नाही तर काय आहे? 'भारतात एवढे बलात्कार होत असतात मग बळी जाणारे आम्हीच का?' असं तोही विचारात होता आणि त्याचा वकीलही.
डॉक्युमेंटरीमुळे अंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होईल आणि त्याचा आपल्या पर्यटनावर आणि आणखी कशावर परिणाम होईल अशी सरकारला भीती वाटत असेल तरीही इथे सरकारचं चुकलेलं आहेच कारण असं बंदी घालून गोष्टी लपवत येत नाही. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. असंही महिला सुरक्षेच्या बाबतीत भारताची प्रतिमा जगात फार उजळ आहे असं मुळीच नाही. नुसतंच incredible India म्हणून भागात नाही तर त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत. नुसते कठोर कायदेच नाही तर त्यांची अंमलबजावणीही तेवढ्याच कठोरतेने आणि तत्परतेने व्हायला हवी. शासन, प्रशासन आणि पोलिस यांनी संवेदनशील आणि जागं असायला हवं. जनतेकडे नुसतं सब्जेक्ट्स म्हणून न पाहता माणूस म्हणून पाहायला हवं. मुख्य म्हणजे न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आंदोलने करावी लागू नयेत कारण सगळ्यांनाच ते जमत नाही आणि तेवढी उर्जाही सगळ्यांमध्ये नसते.
मंगळवार, ३ मार्च, २०१५
स्वयंभू
शब्दांच्याही पार पलीकडे एक जग असतं… अनुभूतीचं… निःशब्द… शांत… धीरगंभीर असं. विचारांचं वादळ जेव्हा मंदावत जातं तेव्हा मनाच्या तळ्यात एक निरव शांतता पसरत जाते… सगळं स्तब्ध होत जातं… स्वप्नं, आकांक्षा, कल्पना, इच्छा, हव्यास, सुख-दुःखं यांचा सगळा गाळ खोल तळाशी जाऊन बसतो आणि एव्हाना धूसर दिसणाऱ्या कित्येक गोष्टी स्पष्ट दिसू लागतात… खिडकीच्या काचा पुसल्यावर बाहेरचं जग दिसावं तेवढ्या आणि तशा. त्या तळ्याच्या काठावर आठवणींचा भला मोठा पिंपळवृक्ष उभा असतो. क्वचितच त्याचं एखादं पान पाण्यावर अगदी अलगद उतरतं. हळुवारपणे ते पाण्यावर तरंगायला लागतं आणि मग केव्हातरी तेही तळाशी जाऊन स्थिरावतं. सगळी इंद्रिये पार थकून तळ्याकाठी विसावा घेत असतात. कुणीच काही बोलत नाही. सगळे आपापलं अस्तित्व अनुभवत असतात. तशात एक सत्य प्रकर्षानं जाणवतं ते हे की आपण उगाच आपल्या अस्तित्वाचा डांगोरा पिटत असतो… अनुभूतीचा टेंभा मिरवत असतो… कल्पनांचे पिसारे फुलवत असतो… सुखाचं प्रदर्शन मांडत असतो… दुःखाचा ढोल वाजवत असतो… या सगळ्यांशिवाय आणि या सगळ्यांच्या पलीकडे अस्तित्व असतं आणि ते नितांत सुंदर असतं, हळुवार असतं, सुखद असतं, आनंदघन असतं आणि मुख्य म्हणजे स्वयंभू असतं.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
