खुर्ची म्हणजे काही निमंत्रण देऊन मिळालेला उपहार नसतो. खुर्चीबरोबर जसे अधिकार येतात तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त कर्तव्येही येतात. खरं तर त्या कर्तव्यांच्या पूर्तीसाठीच खुर्चीला अधिकार बहाल केले जातात. ही कर्तव्ये करीत असताना चहूबाजूंनी टीका होणे अगदी साहजिकच आहे. प्रस्थापिताविरोधी जनतेचा सूरही स्वाभाविकच आहे. जे सत्ता उपभोगतात त्यांनी टीकेला तोंड द्यायची तयारी ठेवावी आणि आपल्या कामातूनच टीकाकारांना उत्तर द्यावे.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
गुरुवार, २८ मे, २०२०
गुरुवार, २१ मे, २०२०
लॉकडाउन की मुस्कटदाबी
कुणी काहीही म्हणा या महामारीच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या अधिकारांवर आणि एकूणच स्वातंत्र्यावर प्रचंड मर्यादा आणल्या आहेत आणि आता असं मर्यादित जगणं हाच नॉर्म होईल की काय ही भीती आहे. हे सगळं लोकांच्या आरोग्यासाठीच आहे असा युक्तिवाद होऊ शकतोही पण हे कुठपर्यंत आणि कधीपर्यंत हा प्रश्न शेवटी उरतोच. लॉकडाउनचं जितकं कौतुक व्हायचं तितकं झालं. इतर देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती चांगली आहे म्हणता म्हणता कोरोनाच्या केसेस लाखावर गेल्या. अर्थव्यवस्थेचे बारा वाजले, लोकांची गैरसोय (खरं तर गैरसोय म्हणणं अंडरस्टेटमेंट असेल, मुस्कटदाबीच म्हणावी लागेल) झाली, देशाचं, समाजाचं वेगवेगळ्या प्रकारचं नुकसान झालं, कित्येकांचं वैयक्तिक नुकसान झालं, होत आहे ते वेगळेच. म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी वेळ आलेली आहे.
रविवार, १७ मे, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)