तुकाराम मुंडेंना लोकांनी चक्क तुकाराम महाराज करून टाकलं आणि तेही असे तुकाराम महाराज जे लोकांना हवे आहेत. तुकाराम महाराज काय किंवा तुकाराम मुंडे काय दोघेही शेवटी माणसेच. त्यांना माणसेच राहू द्या. लार्जर दॅन लाईफ काहीही आणि कुणीही नसतं. किंबहुना लार्जर दॅन लाईफ असं कुणी असावं ही आपण सगळ्यांच्या मनातली भावना असते. सांख्यिकीच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुतेकजण मध्याच्याच अवती भवती कुठेतरी असतात आणि मग कधीतरी कुणी एखादा तुकाराम होतो मध्यापासून थोडा दूर जाऊ पाहणारा. आपण त्यांना लार्जर दॅन लाईफ ठरवून मोकळे होतो आणि आपली आपल्याच कर्तव्यापासून सुटका करून घेतो. आपण आपली नैतिक कर्तव्ये, जबाबदाऱ्या अशा आऊटसोर्स करू पाहत असतो.
आम्हां घरी शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करुं ।। शब्दचि आमुच्या जीवांचे जीवन । शब्दें वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव। शब्दचि गौरव पूजा करुं ।।
रविवार, ३० ऑगस्ट, २०२०
शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
राम
'राम मंदिराच्या बाबतीत तुझी भूमिका काय आहे ?'
'माझ्या भूमिकेचा संबंध काय? एक हिंदू म्हणून माझी भूमिका मंदिर व्हावे हीच असायला हवी आणि आहे . मला अधून मधून स्युडो सेक्युलॅरिझमचे उमाळे नाही येत. राम मंदिराबाबत भूमिका विचारणे म्हणजे मूर्खपणा होय. सत्य काय आहे? त्या जागी आधी मंदिर होते हे सिद्ध झालंय त्यामुळे माझ्याच काय कुणाच्याही भूमिकेचा प्रश्न येतोच कुठे? आणि माझी भूमिका विचारण्यामागचा हेतू मला उजवा, डावा, कट्टर, धर्मांध, सेकुलर, आमच्या बाजूचा, त्यांच्या बाजूचा आदींपैकी एक लेबल लावणे हाच असू शकतो.
मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०
आंतरजातीय विवाह
लग्न हे केवळ दोन व्यक्तिंमधलं नातं नसून दोन कुटुंबांमधलं नातं असतं. आणि जेव्हा दोन कुटुंबे नातं जोडतात तेव्हा अर्थातच कॉम्पॅटिबिलिटीचा विचार होणारच. आताशा कुठे लोकांची वागणूक, राहणीमान, खानपान हे जातींच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये थोडीफार समानता येत आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाहासाठी आपला समाज परिपक्व व्हायला बराच अवधी जावा लागेल असं मला तरी वाटतं. कुठलाही बदल एकदम घडण्यापेक्षा हळूहळू झाला तर दीर्घ काळ टिकतो. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची प्रक्रिया ही क्रांतीपेक्षा उत्क्रांती म्हणून घडली तरच त्यातून चांगलं काही निष्पन्न होईल.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)