पृष्ठे

रविवार, ९ जून, २०१३

लहानपण

आयुष्याच्या एका टप्प्यावर लहानपण हरवलं आणि आता किती किती दूर आलो त्यापासून. इथून ते नीट दिसतसुद्धा नाही. धुसरलेल्या काही आठवणी तेवढ्याच तरळत राहतात. दुःख ते लहानपण हरवल्याचं नाही कारण एका मुक्कामावर ते हरवणारच होतं. दुःख आहे ते त्याबरोबर बरंच काही गमावल्याचं. ती निरागसता, तो जगण्यातला मनमुरादपणा आणि बरंच काही हरवत गेलं. अजून किती आठवणी म्हणून आहेत श्वासांत, गंधांत,स्पर्शात,  हृदयात, डोळ्यांत साठून राहिलेल्या.  पण फक्त आठवणीच तेवढ्या.  त्यांच्यापर्यंत आता पोहचता येत नाही. त्या शब्दांच्या आवाक्यातसुद्धा येत नाहीत. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा