पृष्ठे

शुक्रवार, २१ जून, २०१३

शितू



आज गो. नी. दांडेकरांची 'शितू' वाचायला घेतली. अगदी नवी कोरी, नाजूक. आणि उघडल्या उघडल्या वाचली ती 'पाठवणी' नावाची तिची प्रस्तावना. शितूला गोनीदा त्यांची मानस कन्या मानतात. त्यातलं शेवटचं वाक्य मनाला स्पर्शून जातं. ते असं आहे 

रसिकवृंद! एकच प्रार्थना!
'चित्ता अति हळुवारपणा आणौनिया' शितू वाचावी! ती माझी अत्यंत लाडकी, पण जन्मभर अतिशय सोसावे लागलेली मानसकन्या आहे !

आहे कि नाही अगदी हृदयस्पर्शी? गोनीदांच्या कादंबऱ्या म्हणजे भावनांचं अजब रसायन असतं, भावकल्लोळ असतो. 'मृण्मयी'सुद्धा तशीच.  वाचताना अंतरंग ढवळून निघतात. आणि कोकणची पार्श्वभूमी, निसर्गाने मुक्त हस्ते केलेली रंगांची उधळण यांचं वर्णन हे अजून एक वैशिष्ट्य. आठवीत असताना मराठीमध्ये 'शितू' नावाचा एक धडा होता तो याच कादंबरीतला. तेव्हा साहित्यातला ओ कि ठो कळत नव्हता. आत्ताही फार कळतं अशातला भाग नाही, पण आता साहित्य वाचण्याएवढी संवेदनशीलता आली आहे एवढंच. अजून काय लिहिणार? 'पाठवणी' वाचून शितूबद्दलच्या अपेक्षा फार उंचावल्या आहेत. आणि मी आत्ताच ती वाचायला लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा