पृष्ठे

सोमवार, १७ जून, २०१३

कन्सर्न

परभणीसारख्या छोट्या रेल्वे स्टेशनवर  सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची, विशेषतः अप-डाऊनवाल्यांची, प्रचंड गर्दी असते. आणि त्यातले ९० टक्के लोक रूळ ओलांडण्यासाठी दादऱ्याचा वापर करण्याची तसदी घेत नाहीत. प्लाटफॉर्म वरून उडी मारून रूळ ओलांडायचा जन्मसिद्ध हक्कच. आणि यातले बरेच लोक ऐन गाडी सुटायच्या वेळी प्रकट होतात. मग चालत्या रेल्वेत चढायची धावपळ सुरु होते.कुणी वेगात असलेल्या रेल्वेत शिरतात, कुणी शिरू पाहतात,  कुणी प्लाटफॉर्म एकवर उभ्या असलेल्या गाडीतून पलीकडे प्लाटफॉर्म दोनवरच्या गाडीत जाऊ पाहतात आणि दोन्ही गाड्या चालू होतात. ही असली स्टंटबाजी पाहून इकडे प्लाटफॉर्मवर मी श्वास रोखून त्यांच्या सुरक्षेची चिंता वाहत असतो आणि माझ्याच हृदयाचा ठेका चुकतो. पण मनोमन या असल्या स्टंटबाजांचा खूप रागही येतो. उगाच जीव टांगणीला लावतात माणसाचा. त्यापेक्षा जरा लवकर आलं तर काय बिघडतं? खरं तर मला चिंता करायची मुळीच गरज नाही पण तरीही कन्सर्न हा मानवाचा स्वभाव विशेष आहे, नाही का? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा