पृष्ठे

गुरुवार, १८ मे, २०१७

कर्तृत्व

कर्तृत्वाशिवाय माणूस काहीच नाही. जगात दोनच प्रकारचे लोक असतात - एक म्हणजे कर्तृत्ववान आणि दुसरे म्हणजे कर्तृत्वशून्य. आयुष्याचं सार्थक करायचं की ते व्यर्थ घालवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. जेव्हा आपण सोपा मार्ग निवडतो तेव्हा आपण आयुष्य व्यर्थ घालवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतो. काहीच न करणं फार सोपं असतं, प्रवाहाबरोबर वाहत जाणं त्याहून सोपं असतं. त्यात कसलाच पुरुषार्थ नाही. काहीतरी करण्याची निदान इच्छा असणं ही अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची पहिली पायरी पण फक्त तेवढं पुरेसं नाही. त्या इच्छेला कर्तृत्वाची जोड मिळाली तरच तिला काही अर्थ येतो. नुसतं जागून आपण काय वेगळं करतो? जगतात तर सगळेच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा