पृष्ठे

बुधवार, १७ मे, २०१७

काळ

मावळत्या सूर्याबरोबर विरघळून जातात निर्धारांचे पर्वत, मावळून जातात आशेचे दीप, वितळून जातात संकल्पांचे ढीग आणि गळून जाते जिद्दीचे अवसान. उद्याचा सूर्य अडकून पडतो संशयाच्या भोवऱ्यात आणि एकेक क्षण करतो एकेक युग वजा आयुष्यातून आणि शेवटी जाऊन पडतो भूतकाळाच्या काळकोठडीत कधीही पुन्हा परतून न येण्यासाठी.  हवा असलेला सूर्य युगानुयुगे उगवत नाही आणि नको असलेला सूर्य मात्र अस्त पावत नाही. रात्रीचंही तेच. कित्येक युगांपासून आपण तिथेच आहोत आणि तसेच. बदलत जातो तो फक्त काळ. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा