पृष्ठे

बुधवार, २१ जून, २०१७

एखाद्या शापित संध्याकाळी सगळंच अर्थशून्य वाटायला लागतं. सगळ्या दिशा अंधारात बुडायला लागतात. सगळी क्षितिजे झाकोळून जातात. सगळं आकाश काळवंडून जातं. सूर्य कायमचा अस्तंगत होऊन जातो आणि पुढे पसरते ती पहाटेचा किनारा नसलेली भयाण काळरात्र. मानासहित सगळी गात्रे थकून जातात. कसलंच त्राण उरात नाही. सगळा विरोध मावळून जातो आणि आपल्या हाती उरतं ते फक्त भरकटलेल्या नावेगत वाहत जाणं काळाच्या प्रवाहाबरोबर. पण एवढ्या अंधारातही कुठूनतरी आशेची एक इवलीशी तिरीप डोकावत असते मनाच्या खोल गाभाऱ्यात. ती कायम तिथेच असते आणि ती अविरत देत असते आपल्याला संघर्ष करण्याचं सामर्थ्य आणि लढत राहण्याची उमेद. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा