(आमच्या एका फोन संभाषणाचा हा सारांश)
आनंदाच्या हजार क्षणांपेक्षा दुःखाचा, उद्वेगाचा, वेदनेचा एक क्षण माणसाला स्थितप्रज्ञतेच्या जवळ घेऊन जातो. माणसानं स्थितप्रज्ञ असावं की नसावं हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकतो, पण 'कठीण समय येता' स्थितप्रज्ञ वृत्ती कधीही चांगली असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि तसा अनुभवसुद्धा आहे. 'पण त्यासाठी दुःख भोगलंच पाहिजे का' हाही युक्तिवाद अगदी मान्य. पण आयुष्यात नेहमीच सुख येत नाही हेही सत्य आहे. शेवटी काय तर 'समलोष्टाश्मकांचन' हे महत्त्वाचं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा