पृष्ठे

शुक्रवार, ४ जुलै, २०१४

मनाशी संवाद

प्रत्येक वेळी मागे वळून पाहिल्यावर आपण किती इग्नोरंट होतो (रादर वेडे होतो) हे कळतं. म्हणजे पुढे गेल्यावर कळतं की आपण हे करायला हवं होतं किंवा नको होतं. कारण तेव्हा एक टॉप व्ह्यू आलेला असतो भूतकाळाचा. प्रत्येक पॉईन्टच्या भोवतालची सगळी परिस्थिती माहित असते.  पण वर्तमानात तसं नसतं. वर्तमान एक कोडं असतं. काही अंतरापलीकडे नजरच पोहचत नाही. भविष्यात डोकावणं फार थोड्या लोकांना जमतं. त्यामुळे नेहमी मनात एक फिलिंग असते की मी काहीतरी मिस करतोय जे वेळ निघून गेल्यावर किंवा फार उशीर झाल्यावर कळणार आहे. पण हे अपरिहार्य आहे म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे जे जे करता येईल ते करायचं आणि जे जे समोर येईल ते ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं बस. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा