पृष्ठे

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

आंतरजातीय विवाह

लग्न हे केवळ दोन व्यक्तिंमधलं नातं नसून दोन कुटुंबांमधलं नातं असतं. आणि जेव्हा दोन कुटुंबे नातं जोडतात तेव्हा अर्थातच कॉम्पॅटिबिलिटीचा विचार होणारच. आताशा कुठे लोकांची वागणूक, राहणीमान, खानपान हे जातींच्या पलीकडे जाऊन त्यामध्ये थोडीफार समानता येत आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाहासाठी आपला समाज परिपक्व व्हायला बराच अवधी जावा लागेल असं मला तरी वाटतं. कुठलाही बदल एकदम घडण्यापेक्षा हळूहळू झाला तर दीर्घ काळ टिकतो. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची प्रक्रिया ही क्रांतीपेक्षा उत्क्रांती म्हणून घडली तरच त्यातून चांगलं काही निष्पन्न होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा