आशा निराशेच्या हिंदोळ्यावर माणसाला कसं हेलकावत ठेवायचं ते नियतीला अगदी बरोब्बर कळतं. 'आता आपली नाव बुडून पार रसातळाला जाणार' असं वाटत असतानाच दूर कुठेतरी एखादं बेट धुसरसं दिसायला लागतं आणि मग आपण पंचप्राण एकवटून त्या दिशेने जायला लागतो. पण तिथे पोहचल्यावर मात्र 'यापेक्षा आधीची परिस्थिती काय वाईट होती' अशी अवस्था होते. नियतीने आपला डाव खेळलेला असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा