पृष्ठे

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

आपल्याला जग जसं दिसतं, आपण जी सुखदुःखं अनुभवतो, ते सगळं अगदी जशाला तसं नसलं तरी निदान काही अंशी कुणाला तरी सांगावं , कुठं तरी व्यक्त व्हावं म्हणून शब्दांचा आधार. अनुभूतीला किती अंगं, किती कंगोरे! बदलत जाणाऱ्या, हिंदोळणाऱ्या मनाबरोबर बदलणारे दृष्टीकोण, बदलणारे संदर्भ, बदलणारे अर्थ, बदलणाऱ्या जाणीवा, आणि एकूणच बदलणारं जगच. स्थिर असं काय आहे? शाश्वत असं काय आहे? चिरंतन असं काय आहे? आलेला प्रत्येक क्षण भूतकाळाच्या अथांग सागराचं अंग होऊन जातो, आपल्याही नकळत. आपण "जुने जाऊद्या मरणालागुनी " म्हणत नव्याच्या स्वागतासाठी सज्ज होतो. पण खरंच जुनं ते मरणपंथाला जातं? आपल्यालाही जुनं ते सारंच सरणावर जावं असं कुठे वाटतं ? मला तरी तसं नाही वाटत. उलट जुनं ते सगळंच मस्त वाटतं. ते सुखदायक असो कि क्लेशदायक. असंच कधी कधी चित्रपट पाहिल्यासारखं आठवायचं.  हवं तर फास्ट फॉरवर्ड करायचं, हवा तो भाग रिपीट मोडमध्ये प्ले करायचा. आहे कि नाही मस्त? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा