पृष्ठे

शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३


आपले पोलिस आणि सरकार यांना तहान लागल्याशिवाय विहीर खोदायची गरज वाटत नाही. जेव्हा कुठेतरी स्फोट होतो तेव्हाही हे एकमेकांच्या डोक्यावर खापर फोडण्याशिवाय दुसरं काहीही करत नाहीत. सरकार पोलिसांवर, पोलिस गुप्तचर यंत्रणेवर खापर फोडून जबाबदारी झटकू पाहतात. मग 'तपास चालू आहे', 'हे सहन केलं जाणार नाही',  असल्या पोकळ गप्पा मारल्या जातात. त्यांच्यात काहीही तथ्य नसतं. इतके स्फोट झाले आजपर्यंत, तरीही यांचं दरवेळी बेसिकपासूनच सुरु होतं. आतापर्यंत एक predictive model नाही बनवता आलं यांना? नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही हे शेंबड्या पोरालाही कळतं, मग का नाही पाकिस्तानचं नाक दाबत? या स्फोटाचा कट इस्लामाबादमध्ये शिजला हे उघड आहे. मग का पाकिस्तानशी असलेले संबंध नाही तोडत? पण नाही... इथे आपल्या मंत्रिमंडळात बरेच पाकधार्जिणे लोक बसलेत. आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही आणि हे पाकिस्तानातून कांदा आयात करतात आणि इथे आणून तो सडवतात. 

इथे स्फोटात लोक जीवानिशी जातात पण यांना काय त्याचं? ए.सी.मध्ये बसलेल्या त्यांच्यापर्यंत स्फोटाची झळ आणि आवाज दोन्हीही कसं पोचणार? नुसता स्फोट झाल्या ठिकाणी दौरा केल्याने प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी वेळीच प्रतिबंधक उपाय करावे लागतात आणि हितसंबंधांच्याही पलीकडे जाऊन निर्णय घ्यावे लागतात. उगाच ए.सी.मध्ये खुर्चीवर बसून  दहशतवादाला रंग देत बसलं कि आपल्या XXखाली बॉम्ब ठेवला तरी पत्ता लागत नाही आणि हे असले स्फोट होतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा