पृष्ठे

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२

यश

या जगात काही लोक भयंकर यशस्वी होतात. त्यांच्या यशास त्यांचे प्रयत्न, चिकाटी, कौशल्य इत्यादी सहाय्यभूत असतातच पण सोबतच काही परिस्थितीजन्य गोष्टीही कारण असतात. आणि इतर बरेच जण हे त्यांच्या यशाचे गोडवे गाण्यात आणि त्यांच्यासारखेच यश मिळावे असे इच्छिण्यातच धन्यता मानतात. यशस्वी लोकांचे यश appreciate करायला माझा विरोध नाही पण त्यांचा formula वापरून आपणही यशस्वी होऊ हा समाज करून घेणे अत्यंत चुकीचे आहे कारण यशाचा कुठलाही formula  नसतो. आणि आपण कुणाला यशस्वी म्हणतो हेही जरा तपासून पहिले पाहिजे. विचार केला तर आपल्या लेखी उद्योजक, चित्रपट कलाकार, क्रिकेट खेळाडू, किंवा तत्सम  कुणी तरी ज्यांनी अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे हेच लोक यशस्वी आहेत. यश हे आपण पैशातच मोजतो हि वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आपले आदर्श हे एक तर श्रीमंत किंवा प्रसिद्ध लोक आहेत. माझा या लोकांना किंवा त्यांच्या प्रसिद्धीला किंवा श्रीमंतीला विरोध आहे असं समजण्याचं काही कारण नाही.  विरोध आहे तो आपल्याच काही मातांना आणि ग्रहांना. सध्या फेसबुकवर एक quote शेअर होतोय - "You are successful when people start searching your name in google instead of facebook" -असाच काहीसा . म्हणजे प्रसिद्धी हे तुमच्या यशाचं मोजमाप . काय अर्थ आहे का या असल्या विचारसरणीला? यश हे प्रत्येकाला प्रसिद्धी देऊ शकत नाही आणि त्याची गरजही नसावी . त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत . कुणासाठी रोज सकाळी लवकर उठणे हे यश असू शकते , कुणासाठी चांगले नातेसंबंध हे यश असू शकते. यश हे शेवटी आपल्या आत असतं, बाहेर दिसतं ते फक्त त्याचं प्रतिबिंब. ते सर्वांना दिसतंच असं नाही. यशाला प्रसिद्धीचं वलय असावं लागत नाही. मागे आमच्या ब्रम्हपुत्रा होस्टेलच्या कल्चरल फेस्टीवलच्या  वेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी एक गोष्ट सांगितली होती . आसाम मध्ये कि तिकडेच कुठे एका निर्जन आणि उजाड बेटावर कुण्या एकट्यानेच वनराई फुलवली. त्याचं संपूर्ण आयुष्य तो हेच करत होता . हे यश आहे . निखळ यश. कसल्याही प्रसिद्धीची अभिलाषा नाही, कसलाही उन्माद नाही. 

1 टिप्पणी: