परीक्षा हव्यात की नको या वादाला राजकीय वळण लागलेलं आहे. यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचं काय मत आहे हे जाणून घेतलं पाहिजे. जेएनयू, आयआयटी आदींसारख्या देशातील अग्रगण्य स्वायत्त संस्था/विद्यापीठे याबाबतीत कोणता मार्ग अवलंबीत आहेत हेही एकदा पाहिलं पाहिजे. विशेष म्हणजे स्टेकहोल्डर्स - शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना अंधारात ठेऊन नंतर अचानक सरप्राईझ देण्यापेक्षा (जी नेहमीची सरकारी कार्यपध्दती आहे) विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावेत. केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित असलेल्यांच्या भरवशावर निर्णय घेण्यात येऊ नयेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा