आपण, तथाकथित सुशिक्षित लोक, आकड्यांचे फार वेडे असतो, नाही का? आकडे पहिले की त्यावर विश्वास ठेवण्याकडेच आपला कल असतो. कुणी त्यांच्या विधानाच्या समर्थनार्थ काही आकडे आणि काही आऊट ऑफ कॉन्टेक्सट वाक्ये आपल्या तोंडावर फेकून मारली की अगदी कोणत्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवायला तयार होतो. पण आकडे हे फार फसवे असू शकतात कारण त्या आकड्यांची सत्यता कळण्याचा कुठलाच मार्ग आपल्याकडे नसतो आणि आपण तशी तसदीही घेऊ इच्छित नसतो. कुणास ठाऊक आपल्यापर्यंत आलेले मेसेजेस आणि त्यातले आकडे हे कुणाच्या तरी खोडसाळ डोक्यातच उगवलेले असू शकतात. विशेषतः सोशल मीडियाच्या काळात तर असले आकड्यांनी भरलेले मेसेजेस पसरवणे काही फार अवघड नाही आणि त्यांना मिळणार सपोर्ट पण काही कमी नाही. आपल्या सोयीचा कसलाही मेसेज लोक अगदी विचार न करता पुढे फॉरवर्ड करून देतात. या असल्या मेसेजेसचंसुद्धा एपिडेमिक्ससारखं असतं. एकदा ते बाहेर पडले की पसरत राहतात आणि लोकांचा बुद्धिभेद करत राहतात आणि आपल्याच कोशात जगणाऱ्या बऱ्याच लोकांना आपला बुद्धिभेद झाल्याचं आयुष्यभरही समजत नाही.
सरोजकुमार भोसले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा