पृष्ठे

रविवार, ११ मे, २०१४

बाकी शून्य-४

प्रिय,

आपल्या आयुष्यात होणाऱ्या भूकंपाने फक्त आपणच हादरून जात असतो. जगाला त्याचा मागमूसही नसतो आणि पर्वाही नसते. आणि तरीही आपण उगाच सगळ्यांना ओरडून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. माणसानं आपले अनुभव आपल्यापुरतेच ठेवावेत हेच खरं. आपल्या भाव भावनांचं उगाच प्रदर्शन न मांडलेलं बरं. आणि मुळात तशी गरज का म्हणून वाटावी? माहित आहे ना आपल्या हाकेला उत्तर नाही येणार म्हणून. मग हाक द्यायचीच कशाला? 

-बाकी शून्य 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा