पृष्ठे

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

भाषा

भाषा जशी काही मैलांवर बदलते तशी ती काही काळानंतरही बदलत जाते. मराठीच काय सर्वच भारतीय भाषा अतिशय समृद्ध आहेत आणि काळाच्या ओघात त्यांच्यामध्ये बदल होणार आणि झालेही पाहिजे.   बदलाला विरोध करणारी कोणतीच भाषा दीर्घकाळ टिकू शकत नाही.  भाषेची शुद्धता ही कुणाची मक्तेदारी नाही. भाषेला राजाश्रय जरूर असावा पण राजकीय अट्टाहासाच्या जाळ्यात ती अडकता कामा नये. भाषा टिकवण्याचं , वाढवण्याचं काम हे तुम्हा आम्हा सारखे सामान्य लोकच करीत असतात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा