सगळं किती बदललंय ही भावना स्थलकाल दोन्हीसापेक्ष युनिव्हर्सल आहे. अगदी सगळ्यांना सदैव असंच वाटत असतं. काही प्रमाणात त्यात तथ्यही असतं. पण सगळं बदललंय यापेक्षा पूर्वी सगळं किती छान होतं याकडे लक्ष वेधण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न असतो. माणसाला मुळात खंत असते ती हातून निसटलेल्या वेळेची.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा